Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

The state needs two Chief Ministers, Supriya Sule's statement was heavily discussed

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून भाजपशी युती करून सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकारण ढवळले असल्याचं म्हणले जाते. तसेच नवीन सरकार (Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वारंवार आरोप प्रत्यारोप सुरू असतात. अशातच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं एक विधान सध्या चर्चेत आलं आहे. ते म्हणजे राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची (Chief Minister)गरज आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की सध्या सणवार सुरु असून मुख्यमंत्री सध्या दौरा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सध्या दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक जे कार्यक्रमाला जातील आणि दुसरे जे मंत्रालयात बसून काम करतील.असा मेसेज आपल्याला आल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प

माझ्यासमोर सध्या बेरोजगारी(Unemployment), महागाई हे जनतेच्या संबंधित प्रश्न महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. इतर प्रकल्प राबवण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारी कशी कमी होईल यासाठी चर्चा होणं अपेक्षित आहे.कारण मी स्वतः अनेक मंत्र्यांना माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या कामांसाठी वेळ मागितली. पण ते वेळ देत नाहीये. याचा अर्थ प्रशासन गेल्या अडीच महिन्यापासून ठप्प आहे.प्रशासना बरोबर काम करणाऱ्या मंत्र्यांची राज्याला गरज आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

संविधानाप्रमाणे देशात अनेक पार्टी राहावी

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामतीच्या संदर्भात म्हटलं तर मी संविधानावरती विश्वास ठेवते. कारण जेपी नड्डा यांचे वाक्य मला आठवतं की या देशांमध्ये एकच पार्टी राहिली पाहिजे. पण मला अस वाटत की संविधानाप्रमाणे देशात अनेक पार्टी राहावी . कुठलाही भाजपचा नेता बारामतीमध्ये येत असेल तर त्याचं स्वागतच आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *