
मुंबई : शेतकऱ्याला शेतीसाठी सिंचन पद्धत खूप फायदेशीर ठरते. दरम्यान राज्यशासनाने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक अशा बऱ्याच योजना आणल्या आहेत. राज्य शासनाचे शेतीविषयक प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे शेतकऱ्याला सिंचन करणे सहज शक्य व्हावे ,तसेच शेतकऱ्यांना विजबिलामधुन कायमचे मुक्त करण्यासाठी टप्याटप्याने 1 लाख सौरकृषी पंप स्थापित करून देणे. ही योजना मुख्यमंत्री सौर कृषी पंप म्हणुन राबविण्यात येते.
राज्य शासनाकडुन सुधारित शासन निर्णय दि.01.01.2019 रोजी झाला आहे. यामध्ये पहिल्या टप्यामध्ये 25,000 दुसऱ्या टप्यामध्ये 50,000 तर तिसऱ्या टप्यामध्ये 25000 सौर कृषी संप स्थापित करण्यात येणार आहेत. या सुधारित शासन निर्णयानुसार कोणतीही आर्थिक वाढ न करता लाभार्थ्यांना ही सुविधा देण्यात येणार आहे. यामध्ये सौर कृषी पंपासोबत दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट समाविष्ठ करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी अतिदुर्गम भागामधील ज्या ठिकाणी विजेची सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. सदर निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांकडे बोर वेल, विहीर, नदी अशा शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करणे आवश्यक राहील तसेच या योजनेसाठी भुजल उपलब्धता नकाशे उपलब्ध करण्याची कोणतीही आवश्यकता नसल्याची बाब नमुद करण्यात आले आहेत.
Cyrus mistry: उद्या सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अपघातच कारण आल समोर
योजनेचा लाभ घेण्यासाठी या पात्रता आवश्यक
१)लाभ घेणारा लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे .
२)लाभार्थ्याला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे .
महावितरण कंपनीचे ग्राहक असणारे शेतकरी विजबिलामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातुन सुट घेत असावे.