
Ajit Pawar | राज्याच्या अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांमध्ये \ पुराचे पाणी शिरले आहे. त्याचबरोबर घरांचे देखील नुकसान झाले आहे. या सगळ्या घटनांची दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत या घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
अजित पवारांच्या तीन घोषणा नेमक्या कोणत्या?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये आज पूरस्थितीवर त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी धडाकेबाज घोषणा केल्या आहेत. यामधील पहिली घोषणा म्हणजे, पूरग्रस्तांना तातडीचे दहा हजार रुपयांची मदत मिळणार त्याचबरोबर दुसरी घोषणा म्हणजे दुकानाचे नुकसान झाल्यास पन्नास हजारांची मदत केली जाणार आणि तिसरी व शेवटची घोषणा म्हणजे, मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत दिली जाणार या गोष्टीमुळे पूरग्रस्त नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
Harshvardhan Jadhav । आत्ताची सर्वात मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका
घोषणांबरोबर अजित पवारांनी अजूनही काही महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी मोठा पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी पंचनामे काढण्याची निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. त्याचबरोबर पुरात घराचं नुकसान झालेल्यांना ५ ऐवजी १० हजारांच सहानुग्रह अनुदान म्हणून देण्याचे निर्देश दिले आहेत. असं अजित पवार यांनी विधान परिषदेमध्ये सांगितल आहे.