
वाहतुकीचे नियम (Traffic rules) कडक केले तरीही राज्यात अपघाताचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. राज्यात दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. अपघातांची मालिका दररोज सुरु आहे. सध्या देखील असेच दोन भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या (Nashik) सप्तश्रृंगी गडावरून (Saptsringi Fort) येत असताना बस (Bus) दरीत कोसळली आहे. (Latest Marathi News)
आज पहाटे 6.30 ते 6.45 च्या सुमारास सप्तश्रृंगी देवीचं दर्शन करून भाविक येत असताना शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा अपघात (Nashik Bus Accident) झाला आहे. यामध्ये एक भाविक जागीच ठार झाला तर 20 ते 25 भाविक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले. या जखमींवर नांदुरी आणि वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Monsoon Update । राज्यात पावसाचे थैमान! अंगावर झाड पडल्याने आतापर्यंत ४ जणांचा बळी
दरम्यान, आज सकाळी समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) खासगी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रक आणि खासगी बसची धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी आणि पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरु केले. सध्या या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ajit Pawar । अजित पवार मुख्यमंत्री होणार! भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
राज्यात दररोज ठिकठिकाणी ब्रेक फेल होऊन, टायर फुटून तसेच जनावर आडवे येऊन अपघात होत आहेत. या अपघातात निष्पाप लोकांचे बळी जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे, अशी मागणी आता सर्व नागरिक करू लागले आहेत.
अजित पवारांना पुतण्या देणार शह! आगामी निवडणुकीसाठी पवार कुटुंबातील ‘या’ सदस्याची चर्चा