
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) पुन्हा एकदा पक्षावर नाराज दिसत आहेत. इतकंच नाही तर खुद्द पंकजा मुंडे यांच्याकडून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. खरे तर अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत (Delhi) राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्या पक्षावर नाराज आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “सध्यातरी आपल्याला राजकारणात काहीही मिळण्याची लालसा उरलेली नाही. समाजातील अखेरच्या व्यक्तीच्या विकासासाठी काम करत राहण्याचा सल्ला मला गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्यामुळे आपली पुढील वाटचाल कायम राहणार आहे. राजकारणात काहीच राहिले नाही तर ऊस तोडायला शेतात जायची आपली तयारी आहे.”
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
याचवेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी भाजप पक्षाची आहे. पण भाजप पक्ष माझा होऊ शकत नाही. ” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पंकजा मुंडेंच्या बंडखोर वृत्तीनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. पंकजा मुंडे यांनी परिणामांची पर्वा न करता निर्णय घ्यावा, असे शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.