
पूर्वीच्या काळी शेतातील कामांसाठी बैलांचा वापर केला जात होता. शेतीच्या कामांसाठी आता ट्रॅक्टर आले असले तरी आजही ग्रामीण भागात बैलांची क्रेझ कायम आहे. बैलगाडा शर्यत ( Bullock Cart Race) हे यामागचं एक मोठं आणि महत्त्वाचे कारण समजले जाते. आता बैलगाडा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून तामिळनाडू सरकारने केलेला कायदा वैध ठरवला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचा कायदाही वैध असल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता बैलगाडा शर्यतीचा रस्ता मोकळा झालाय. यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे.
तामिळनाडु, कर्नाटक, महाराष्ट्राबरोबर इतर राज्यात बैलगाडा शर्यत, जलीकट्टू, कंबाला यांना परवानगी देणाऱ्या कायद्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तब्बल पाच महिन्यांनंतर याप्रकरणी निर्णय देण्यात आला आहे.
भीषण अपघात! पंढरपूर देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा अपघात; क्षणातच संपूर्ण कुटुंब उद्धवस्त