
राज्यात अवकाळी पावसाचे संकट आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावासाठी देखील झगडावे लागत आहे. एकापाठोपाठ एक येणारी नैसर्गिक संकटे व उत्पन्न निघूनही शेतीमालाला न मिळणारा भाव यामुळे शेतकरी चांगलेच कात्रीत सापडले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन, कापूस व तुरीचे दर कमीच आहेत. यामुळे शेतकरी आपल्या मालाची विक्री न करता उत्पन्न साठवून ठेवत आहेत. दर वाढल्यावर माल विकू या आशेवर ते सध्या टिकून आहेत.
शेतकरी मुलाशी लग्न केल्यास मुलीला मिळणार 2 लाख रुपये; ‘या’ नेत्याने केली मोठी घोषणा
दरम्यान, येत्या काळात सोयाबीन, कापूस व तुरीचे दर काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मागील वर्षी कापसाला 12 हजार प्रति क्विंटल दर मिळाला होता. ( Cotton rate) यंदा तो किमान 10 हजार मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला न्हवता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कापसाची आवक वाढली आहे. तसेच चालू महिन्यात कापसाचे दर वाढतील असा अंदाज आहे.
गौतमी पाटील आणि इंदुरीकर महाराज दोघांनाही लोक नाव ठेवतात; ज्येष्ठ साहित्यिकाची जोरदार टीका
दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी फार कमी प्रमाणात सोयाबीन ( Soyabean Rate) विकला. परंतु, आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीनची विक्री वाढली आहे. यामुळे सोयाबीनचे भाव नीचांकी पातळीवर होते. मार्चमध्ये सोयाबीनला 5 हजार रुपये इतकाच दर मिळाला होता. अगामी काळात दर वाढण्याची शक्यता कमी आहे. मागील हंगामात उत्पादन आणि आयतीमुळे तुरीचे दर कमी होते. मात्र सध्या तुरीचे दर तेजीत असून 8 ते 9 हजार रुपये एवढा दर तुरीला मिळत आहे. मात्र सरकारच्या महागाई कमी करण्याच्या धोरणामुळे आता तुरीचे दर घसरू शकतात.
“…तर आमदार, खासदारांना मारा”; प्रकाश आंबेडकर यांच खळबळजनक वक्तव्य