
सगळीकडे होळीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. देशाच्या विविध भागामध्ये होळी वेगेवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. रंगांची उधळण करत होळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. तर काही गावामध्ये काही वेगळ्या पद्धती असतात त्यामुळे त्या गावात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. आपल्या भारतात असे एक गाव आहे ज्या गावामध्ये होळीला रंग नाही तर दगड फेकून मारले जातात. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही मात्र ही गोष्ट खरी आहे. चला तर मग जाणून घेऊया या अनोख्या गावाबद्दल माहिती.
ब्रेकिंग! पुण्यात अचानकपणे अवकाळी पावसाला सुरवात
हे अनोखे गाव म्हणजे झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यातील बरही चटकपुर (Barahi Chatkpur) या गावात वेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी या गावातील शेतामध्ये लाकडी खुंटा रोवला जातो. आणि परंपरेनुसार गावातील लोक शेतात रोवलेला हा लाकडी खुंटा उपटण्याचा प्रयत्न करतात आणि खुंटा उपटण्याच्यावेळी शेतात जमलेला लोकांचा जमाव त्यांना दगड आणि शेतातील मातीची ढेकळे फेकून मारतो. आणि ज्यावेळी हे लोक दगड आणि ढेकळे मारतात त्याचवेळी जो खुंटा उपटतो त्याला या गावात भाग्यवान मानले जाते.
अंबानींच्या पर्सनल ड्रायव्हरला महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार; ऐकून थक्क व्हाल?
यामध्ये कोणतेही वैर नसून गावातील लोक हे एकदम एका खेळाप्रमाणे खेळतात. या गावातील होळी पाहण्यासाठी लोहरदगा जिल्ह्याव्यतिरिक्त आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येतात. मात्र, या खेळामध्ये फक्त याच गावातील लोकांना सहभाग घेता येतो. आता सध्या या गावाची सगळीकडे जोरदार चर्चा चालू आहे.
चिमुकल्यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली; म्हणाले, “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके”