
Khalapur Landslide । खालापूर : रायगड (Raigad) जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे या भागात अनेक दुर्घटना घडत असून नुकतीच खालापूर (Khalapur) तालुक्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) गावात खूप मोठी दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे या वाडीवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. (Latest Marathi News)
Vidarbha Rain । विदर्भात पावसाचा तांडव! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे युद्धपातळीवर एनडीआरएफ टीमचे (NDRF team) रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. इर्शाळवाडीत सुमारे 229 लोकसंख्या होती. त्यापैकी आतापर्यंत फक्त 27 जणांचे मृतदेह सापडले असून अजून 78 जण बेपत्ता आहेत तर 119 जणांना वाचवले आहे. हे लोक ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सततचा कोसळणारा पाऊस, चिखल आणि अपुऱ्या सुविधांमुळे रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आहेत.
आणखी आठवडाभर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे, अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे. दरम्यान, प्रत्येकजण आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा शोध घेत आहेत. ग्रामस्थांचे रडून रडून हाल झाले असून सापडलेल्या मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार केले आहेत. या परिसरात प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे.
Urfi Javed । उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून चाहते वैतागले, म्हणाले; ‘तू इतकी वाईट..’